Mahesh Mhatre


भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अत्यंत महत्त्व आहे. आमचे तुकाराम महाराज तर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे म्हणतात. नदीला ‘गंगा मैया’, तर जमिनीला ‘धरती माता’ मानणारे भारतीय दूध देणाऱ्या गायीलाही देवत्व देतात; परंतु प्रत्यक्षात आमच्या देशातील प्रत्येक नदी प्रदूषित झालेली दिसते. जगातील कोणत्याच देशात होत नसेल एवढी जमिनीची प्रचंड धूप फक्त भारतातच होते. एवढेच नाही तर आम्ही आमच्या हवेलाही प्रदूषित करून टाकलेले आहे. गेल्याच आठवडयात फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सिन आणि जर्मनीच्या कोलोन गावाजवळून जाणारी -हाईन या दोन्ही नद्यांच्या स्वच्छ आणि सुंदर पात्रांतून सुमारे ५० ते ६० किलोमीटर प्रवास करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण जलप्रवासात नदीच्या पात्रात एकही प्लॅस्टिकची पिशवी वा इतर कुठलाही कचरा वा निर्माल्य पाहायला मिळाले नाही. दोन्ही नद्यांच्या काठांवर छान झाडी, उद्याने, मनोरंजन केंद्रे आणि काही अंतरावर हॉटेल्स पाहायला मिळत होती. कुठे एखाद् दुसरा माणूस निवांतपणे मासेमारी करताना दिसायचा. नद्यांमधून फिरणा-या बोटी-जहाजांमधून पाण्यात काहीही खाली पडणार नाही, याची सगळेच जण दक्षता घेत होते. पर्यावरणरक्षणाची एवढी काळजी घेणारा हा युरोपियन समाज नदी, पर्वत वा धरती मातेला देवत्व न देता हे जपतो आणि आम्ही भारतीय नदी-धरती-झाडे अशा सगळ्याच निसर्ग प्रतीकांचा अमानुष विध्वंस करताना त्यांची पूजा करण्याचा आव आणतो. हा विरोधाभास फक्त युरोपच नाही, तर सगळ्याच प्रगत देशांत फिरताना दिसतो.. उत्तराखंडाची ही आपत्ती निसर्गाच्या रौद्रतांडवातून आलेली दिसत असली तरी तिचा उगम मानवी चुकांच्या डोंगरातून झालेला आहे, हे आपण मान्य केलेच पाहिजे.
Read More …

पर्यटन हा आजकाल अत्यंत किफायतशीर आणि अनेकांच्या हाताला काम मिळवून देणारा व्यवसाय बनत चालला आहे. निव्वळ पर्यटनावर राज्यातील किंवा देशातील लोक चांगले जीवन जगू शकतात, याचे उदाहरण स्वित्झर्लंडलडने जगासमोर सादर केले. त्यापाठोपाठ छोटया-छोटया देशांनीही आपल्याकडील चांगल्या गोष्टींचे योग्य ‘मार्केटिंग’ करून जगातील जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचण्याचा गेल्या तीन-चार दशकांत जणू चंगच बांधला. त्यामुळे सिंगापूर, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया आदी राष्ट्रांची अर्थव्यवस्था सुधारली, तर इजिप्त, तुर्कस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांतील अर्थकारणाला ब-यापैकी आधार लाभला. आपल्याकडे  केरळने पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती कशी करावी, याचे उदाहरणच सगळ्यांपुढे ठेवले आहे. काश्मीरने तर दहशवादाच्या वणव्यातही पर्यटनाचे रक्षण आणि संगोपन केले. राजस्थान हा परदेशी पर्यटकांसाठीचा आवडता प्रांत, पण त्या तुलनेत महाराष्ट्रात ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि कोणत्याही पर्यटकाला आवडतील अशी डझनावारी ठिकाणे आहेत; परंतु कोकण वगळता महाराष्ट्राच्या कोणत्याही क्षेत्राने पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत, त्यामुळे परदेशात विशेषत: पॅरिससारख्या जगातील सगळ्यात जास्त पर्यटकांना आकर्षित करून घेणा-या शहरात गेल्यानंतर आपल्याकडे स्वच्छता, सौंदर्य, सुविधा आणि सहकार्याकडे बघण्याची दृष्टीच नसल्याचे लक्षात येते. निसर्गाने सौंदर्याची भरभरून उधळण केली असतानाही लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे या परमेश्वरी देणगीचा उपयोग करून घेतला जात नाही. सुजाण आणि सजग लोकांनी हे कुठेतरी थांबवले पाहिजे.

Read More …

ग्लोबल एडिटर्स नेटवर्क परिषदेत पत्रकारितेशी संबंधित अनेक नवनवीन संकल्पनांवर व्यापक आणि रंजक विचारमंथन होत आहे.
Read More …

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ परिषदेमध्ये गुरुवारी ‘डेटा जर्नलिझम अ‍ॅवॉर्ड’ या पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली. झपाटयाने विस्तारत चाललेल्या पत्रकारिता क्षेत्रात अचूकता आणि प्रावीण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आकडेवारीच्या आधाराने होणा-या पत्रकारितेबद्दल दिले जाणारे अशा प्रकारचे हे एकमेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.
Read More …

हल्ली शोधपत्रकारिता बहुतेक संघटनांमधून लोप पावत चालली आहे. काही मोजके शिलेदार मात्र या क्षेत्रात अजूनही किल्ला लढवत आहेत. अशीच एक संघटना म्हणजे अमेरिकेतली ‘प्रोपब्लिका’.
Read More …


ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधन संचालक रॉबर्ट पिकार्ड यांनी ड्रोन पत्रकारितेचे विविध कंगोरे उलगडून दाखवले.

Read More …

फ्रान्सच्या राजधानीत उतरल्यानंतर पहिल्यांदा भावली ती येथील आल्हाददायक हवा. ‘ग्लोबल एडिटर्स नेटवर्क’ या संघटनेतर्फे आयोजित तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रमांची परिषद बुधवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी गेले दोन दिवस पॅरिसनगरीत उतरत असलेल्या प्रतिनिधींसाठी जणू उत्तम वातावरणनिर्मितीच झालेली दिसते! येथील हॉटेल दा व्हिल येथे तीन दिवस ही परिषद होत आहे. ही वास्तू म्हणजे पॅरिसची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. अगदी सन १३५७ पासून ही इमारत या प्राचीन नगरीचे राजकीय आणि सामाजिक केंद्र बनून गेलेय.

Read More …

मध्यंतरी आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या विविध एफ. एम. चॅनेल्सवर एक काव्यात्म जाहिरात प्रसारित केली जायची. ‘शुभवाणी, लाभवाणी, आकाशवाणी’ कोणत्याही व्यावसायिकाला आवडेल अशी ‘शुभ-लाभ’ या व्यापारी वर्गाच्या आवडत्या प्रतीकांची गुंफण करून ती जाहिरात केली गेली होती.. परवा लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीनामा नाटयाच्या सुमारास ती जाहिरात पुन्हा आठवली. संघ परिवार व भाजपमध्ये असलेल्या व्यापारी वृत्तीच्या नेतृत्वाने ‘ना शुभवाणी, ना लाभवाणी, अडवाणी’ अशी भूमिका घेतल्याने ‘लोहपुरुष’ अडवाणी ‘मोहपुरुष’ बनले आहेत. तर नरेंद्र मोदींना राष्ट्रीय प्रचारप्रमुखपद मिळाल्याने सगळ्याच भाजप नेत्यांना ‘नमो नम:’चा मंत्र जपण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
Read More …

मराठी भाषा म्हणजे काय, असा प्रश्न कुणी विचारला, तर माझे उत्तर असेल.. मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार. मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड, मराठी संताजी-धनाजीची स्फूर्ती, मराठी सावरकरांची कीर्ती, मराठी महन्मंगल मूर्ती शारदेची.
Read More …