Mahesh Mhatre

दिल्ली हे आपले राजधानीचे शहर, तब्बल आठशे र्वष भारतासारख्या विस्तीर्ण देशाच्या राजकारणाची सूत्रे या शहरातून हलत आहेत. हे शहर पॅरिससारखे रंगेल नाही की, वॉशिंग्टनसारखे रगेल नाही. या शहराला लंडनसारखी ऐट नाही की मॉस्कोसारखी भीतीची छाया नाही, पण तरीही दिल्ली मोहक आहे. आकर्षक आहे. तिच्या अफाट आकर्षणाने जसे अनेक आक्रमक ओढवून घेतले, त्याचप्रमाणे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेले राज्यकर्तेही तिने ‘एन्जॉय’ केले. अनियंत्रित, सुल्तान, बेफाम राजे, मोगल शहेनशहा आणि ब्रिटिशांच्या ‘साहेबी’ तंत्रामधून सावरत दिल्ली आज लोकशाहीच्या ‘झाडाखाली’ उभी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांमध्ये या शहराने अनंत अनुभव घेतले. सर्व प्रकारचे सत्ताधीश सहन केले. जे पटले नाहीत त्यांचे निर्घृणपणे दमन केले. देशाच्या राजकारणात नवमन्वंतर घडविणारा अरविंद केजरीवाल नामक नवा आशेचा किरणही दिल्लीनेच दिला, पण त्या ‘किरणाने’ दिल्लीच्या रस्त्यावर ‘अविनय कायदेभंग’ करून स्वत:चे ‘रंग’ दाखवून दिले आहेत. ‘आप’ल्याला हृदयात स्थान देणा-या दिल्लीवर केजरीवाल यांनी सलग दोन दिवस राजकीय बलात्कार केला आहे. त्याची शिक्षा त्यांना जरूर मिळेल. लोकांनी पाठ फिरवल्यावर अण्णा हजारे यांचे आंदोलन जसे भुईसपाट झाले होते. तीच गत अरविंद ‘केरसुणीवाल’ यांची होईल.
Read More …

कवी, लेखक किंवा अन्य कोणताही कलावंत जेव्हा ‘व्यक्त’ होतो, तेव्हा त्याच्या त्या अभिव्यक्तीमागे असंख्य प्रेरणा असतात. त्यातील ब-याच प्रेरणा खुद्द कवी वा कलावंताला पण अनोळखी असतात. त्यामुळे जेव्हा एखादा समीक्षक कवितेची वा चित्राची समीक्षा करतो तेव्हा तो हमखास चुकीच्या निष्कर्षावर काथ्याकूट करत बसतो. नामदेव ढसाळ या महाकवीच्या कवितांनी तर मराठीतील मर्यादित भावविश्वाला गावकुसाबाहेरील अफाट अवकाशाचे ज्ञान करून दिले होते. त्यामुळे त्यांच्या कवितांनी मध्यमवर्गीय मराठी वाचक-समीक्षकांचे डोळे विस्फारले गेले. ढसाळांच्या आक्रमक भाषाशैलीने, नव्या प्रतिमा चिन्हांनी समीक्षक नामक प्राणी सैरावरा पळून गेले. त्यामुळे ढसाळांना काही फार फरक पडला नाही. मराठी भाषेचे मात्र अतोनात नुकसान झाले. ऑस्वॉर्न या सौंदर्यशास्त्रावर अधिकारवाणीने लिहिणा-या तज्ज्ञाने एका ठिकाणी ‘कलाकृती हा एक सजीवबंध असतो’ असे म्हटले होते, उदाहरणच द्यायचे तर ढसाळांची कविता पाहू. त्यांच्या प्रत्येक कवितेचा पोत इतका घट्ट असतो की, त्यातून एक शब्दही तुम्हाला काढता येत नाही किंवा त्याला तुमचे ठिगळही लावता येत नाही; कारण त्यांच्या कवितेत सजीवबंध रसरसून भरलेला होता. भृतृहारी, जो रसिक होता, कवी, राजा, विचारवंत, तत्त्वज्ञही होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ‘ज्याच्या कवितेत रस आहे, त्या कवीला म्हातारपण आणि मृत्यूचे भय नसते.. तो कवी अमर असतो.
Read More …

गुजराती लोकांचे खाण्यावर विलक्षण प्रेम. ते जेवढे प्रेम पैशावर करतात, तेवढेच खाण्यापिण्यावर, त्यामुळे गुजरातीत उजव्या हाताला, उजवा म्हणण्याऐवजी ‘जमणा हात’ म्हणजे ‘खाण्यासाठीचा हात’ म्हटले जाते. तर अशा या खाद्यप्रेमी गुजराती समाजाची सुरतेवर खूप माया आहे; कारण सुरती फरसाण, पेढा, बर्फी आणि सुरती उंधियूने गुजराती समाजाचे पिढयान् पिढ्या पोषण केले. इतिहासकाळापासून समृद्ध बाजारपेठेमुळे सुरती लोक छानछोकी आणि खाण्यापिण्याचे शौकिन बनले नसते तरच नवल, तर अशा लोकांना गुजरातेत ‘सुरती लाला’ म्हणण्याची प्रथा आहे. आणि त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी तर पिढ्यान् पिढ्या म्हणी, वाक्यांमधून अजरामर झालेल्या दिसतात. त्यामधूनच ‘सुरतमा जमण अने काशीमा मरण’ म्हणजे जेवायचे असेल तर सुरतेत आणि मरायचे असेल तर काशीत, अशी म्हणही प्रचलित झालेली दिसते, तर अशा या गुजराती समाजाच्या आवडीचा विषय असणा-या सुरतेचा इतिहास शिवाजी महाराजांच्या दोन स्वा-यांनी बदलला. त्यानंतर सुरत बदसुरत झाली आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनत गेली.. मोदींनी रायगडावर येऊन मराठ्यांचा वेगळा इतिहास मांडण्याची चूक केली, म्हणून पुन्हा एकदा सुरतेवर प्रकाशझोत टाकणे भाग पडले.
Read More …


मराठीपुढे नवतंत्रज्ञानाधारित इंग्रजीने मोठे आव्हान उभे केले आहे. त्याला तोंड देण्यासाठी जर साहित्यिक वा राजकीय नेते पुढे येत नसतील, तर मावळ्यांच्या निष्ठेने तुम्ही-आम्ही सर्वांनी छातीचा कोट करून मन:पूर्वक मराठी जपली पाहिजे…
Read More …